लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा**शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*अतुल कोल्हेभद्रावती.

*जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा*

*शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*

अतुल कोल्हेभद्रावती. 
                काही दिवसांपूर्वी पुण्यात एका अल्पवयीन वाहनचालकाने बेजबाबदारपणे चारचाकी वाहण चालवून दोन निरपराध नागरिकांचा बळी घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातही अल्पवयीन दुचाकी तथा चारचाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.त्यामुळे भविष्यात येथे कोणतिही अनुचीत घटना घडू नये यासाठी त्वरीत दखल घेऊन जिल्ह्यात एक विषेश मोहिम राबवून अल्पवयीन वाहणचालकांवर कठोर कारवाई करावी व जिल्ह्यातील दारु तथा बारमालकांना अल्पवयीन युवकांना दारु विक्री न करण्याची सुचना द्यावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधिक्षकांना एक निवेदन देण्यात आले आहे. अल्पवयीन वाहनचालकांकडून जिल्ह्यत बेजबाबदारपणे दुचाकी व चारचाकी वाहणे चालविण्याने याआधी अनेक अपघात घडले आहे. या अपघातांमधे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.या बेलगाम वाहणधारकांमुळे पादचारी नागरीकांत भिती निर्माण झाली आहे.याशिवाय बार व दारु दुकान मालकांकडून अल्पवयीन युवकांना दारु विक्री केल्या जात असल्याचे आढळून येत आहे.या प्रकारावर त्वरित आळा घालून अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाईची मोहीम सुरु करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.या गंभीर विषयाची त्वरीत दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे जिल्ह्यात सर्वत्र जन आंदोलन ऊभारण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.निवेदन सादर करतांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, विधानसभा संघटक नरेश काळे,चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, अरविंद धिमान आदी ऊपस्थीत होते.

Comments