लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोर्यात विनापरवानगी पक्के बांधकाम; नोटीस ला जुमानले नाही, आता गुन्हा दाखल होणार

वरोर्यात विनापरवानगी पक्के बांधकाम; नोटीस ला जुमानले नाही, आता गुन्हा दाखल होणार

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा, (९/४/२६) – नगरपरिषदेच्या एकापाठोपाठ एक नोटीस  देऊन सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाच्या कोणत्याही नोटीसला न जुमानता वरोरा येथील कॉलरी प्रभागात  विनापरवानगी पक्के बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नगरपरिषदेला मिळालेल्या तक्रारीनुसार, श्री मुस्तफा युसुफ अली बोहरा यांनी राजेश लक्ष्मण हरीयाणी (वय ४६) यांच्यावर विनापरवानगी बांधकाम करत असल्याची तक्रार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर नगरपरिषदेने दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी स्थळ निरीक्षण केले असता हरीयाणी यांच्या जागेवर पक्के बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले.

नगरपरिषदेने दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली, परंतु त्यांनी ती धुडकावून बांधकाम सुरू ठेवले. त्यानंतर ८ व ११ सप्टेंबर रोजी पुन्हा तक्रारी आल्याने नगरपरिषदेने कलम ५४ व ५३ अन्वये अनुक्रमे १५ सप्टेंबर २०२५ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीसा बजावल्या, तरीही आरोपीने बांधकाम पूर्ण केले.

शेवटी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम नोटीस देऊन अवैध बांधकाम स्वखर्चाने काढून टाकण्याचा आदेश दिला, मात्र आजतागायत तो हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे सहाय्यक नगर रचनाकार ऐश्वर्या मोरेश्वर चरडे यांनी मुख्याधिकारी यांच्यामार्फत आरोपीविरुद्ध कलम ५३ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. पुढील कारवाई नगरपरिषद व वरोरा पोलीस प्रशासन करणार आहे.

.............



Comments