लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन.मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता  बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन.

मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील संभुनाथ वरधने यांनी जाण्यायेण्याचा मुख्य रस्ता बेकायदेशीररित्या टीन वेल्डिंग करून बंद केल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनाथ जयस्वाल (मालिक डी आर जयस्वाल लिकर शॉप) व समस्त व्यापाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्जानुसार, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून हा १०-१२ फूट रस्ता पायवाट व मोटरसायकलसाठी वापरात होता. दिनांक ०४/०४/२०२६ रोजी कोणालाही न विचारता वरधने यांनी हा रस्तावर टीनाचे वेल्डिंग करून बंद केला. यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे. 

अर्जात  संतोष सेलुकर व कैलास तडसे तसेच अन्य व्यापाऱ्यांचा  पाठिंबा आहे. प्रशासनाने या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामा करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून देशी विदेशी दारूचे दुकान असल्याने मोठ्या प्रमाणात आंबट शौकीन या ठिकाणी दारू पिल्यानंतर या रोडवरच मूत्रविसर्जन करीत असतात . त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यानंतर रोड बंद करून सुद्धा हा प्रकार थांबलेला नाही. त्यामुळे नगरपालिकेचा हा उपाय अडचणीचा ठरत आहे. 
 
आता रस्ता बंद केल्याने आजूबाजूला असलेले गोडाऊन व जाणे येण्यासाठी असणारा जवळचा मार्ग बंद झाल्याने रोडच्या दोन्हीही बाजूच्या व्यापाऱ्यांना जाणे करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

या परिसरात लवकरात लवकर मुत्रीघर बांधण्याची गरज असल्याचे मत व्यापारी वर्गांनी व्यक्त केली आहे. किंवा या ठिकाणी असलेले सर्व दारूचे दुकाने गावाच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मात्र बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये मुत्री घराचा मुद्दा वारंवार येऊन सुद्धा नगरपालिकेने कोणताही ठोस निर्णय अजून पर्यंत घेतलेला नाही त्यामुळे हा प्रश्न अजूनच गंभीर होत आहे.
..................


Comments