लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे  हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
वरोरा / प्रतिनिधी

 कॉलरी वॉर्ड, वरोरा येथील कल्याणेश्वर हनुमान मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले  हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाले. या संमेलनाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  ग्राम दिंडी काढून धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व उद्बोधनपर कार्यक्रम पार पडले.
या संमेलनात संत आशीर्वचनासाठी इंजिनियर उदयपाल वणीकर महाराज (राष्ट्रीय प्रबोधनकार, कीर्तनकार) यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अतुल नंदकिशोर शेंडे (विवेक विचारमंच, विदर्भ प्रांत संयोजक) यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृती, एकता व सामाजिक बांधिलकी यावर विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष घुमे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते संचालन माया बजाज यांनी केले. त्यांच्या सुस्पष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे संयोजक संजय दानव यांचीही मंचावर उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन सुबकपणे पार पडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका मनिषा दानव, छाया चव्हाण, ज्योती किटे तसेच प्रशांत साळवे, सुनील इंगळे, प्रफुल मांदाडे, नूतन बुरडकर, सार्थक नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या विराट हिंदू संमेलनामुळे परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यात आला.

Comments