वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

विदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी नागपूर येथे महत्त्वाची बैठक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसराजजी अहिर व बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे हजर

विदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी नागपूर येथे महत्त्वाची बैठक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसराजजी अहिर व बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे हजर

नागपूर, : चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील तसेच विदर्भातून आलेल्या नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागपूर येथे आकाशवाणी विश्रामगृहात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजभैया अहिर तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांची उपस्थिती लाभली.
बैठकीत विदर्भ प्रदेशातील ग्रामीण भागातील विकास, शेतीसंबंधित समस्या, पाणीटंचाई, रोजगाराची अनुपलब्धता, तरुणांसाठी कर्जसुविधा, सहकारी बँकेतील अडचणी, शैक्षणिक सुविधा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. स्थानिक प्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रातील विशिष्ट अडचणी मांडल्या.

मा. हसराजजी अहिर यांनी सर्व समस्यांची नोंद घेतली आणि संबंधित मंत्रालयांमार्फत व केंद्र शासनाच्या योजनांद्वारे त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर, श्री. रविंद्र शिंदे यांनी शेतकरी, लघु उद्योजक तसेच सामान्य नागरिकांना सहकारी बँकेमार्फत सुलभ कर्जव्यवस्था, राबता आणि आर्थिक मार्गदर्शनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकेमुळे विदर्भातील स्थानिक समस्यांकडे केंद्र सरकार व स्थानिक आर्थिक संस्थांचे लक्ष वेधले गेले आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करून प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याची संकल्पना व्यक्त केली. बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments