वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश. चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. 
दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश. 

चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.

वरोरा 3/11/2025
चेतन लूतडे 

वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले होते. 
मात्र दोन मुले पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.

             मृतक प्रणय विनोद भोयर, वरोरा 

रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.
            मृतक रुपेश विजेंद्र खूळसंगे 

या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित पाण्यात उडी मारून बचावकार्य सुरू केले. 
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र रुपेश ला काडी चा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याला गुराख्याची काडी पकडता आली नाही. आणि प्रणय नदीच्या धारेवर असल्याने दूर वाहत गेला होता. 
ही दुर्देवी घटना तिथे असलेले प्रत्यक्ष दर्शनी त्यांचे दोन मित्र व चराई करणार्या व्यक्तीने सांगितले होते. 

या घटनेनंतर चंद्रपूर रेस्क्यू टीमने आपले प्रयत्न सुरू केले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत वर्धा नदीपत्रात मुलांचे शव मिळाले नाही. यानंतर आज सोमवारला सकाळी पुन्हा प्रयत्न सुरू केले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. 
या मुलांचे शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले. 



Comments