लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.


चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरनंतर चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय रचला. हा दिवस बौद्ध समाजासाठी तसेच सामाजिक समतेच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जातो.
दरवर्षी या दिवशी देशभरातून लाखो आंबेडकरी बांधव आणि बौद्ध धर्मीय चंद्रपूरच्या या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमतात. मात्र, या पवित्र दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या दिवशी रजा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे १६ ऑक्टोबर हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षा दिनाचे महत्त्व लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना या दिवसाचा सन्मान करता यावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे सुलभ होईल असे म्हटले जात आहे.

Comments