लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्हा बँक परिसरात गुरुदेव शक्ती कार्यरत असल्याची प्रचिती...*

*चंद्रपूर जिल्हा बँक परिसरात गुरुदेव शक्ती कार्यरत असल्याची प्रचिती...*

चेतन लूतडे 
आज (दि.३० सप्टेंबर), चंद्रपूर शहरात नागपूर रोड लगत एक सुखद चित्र बघायला मिळाले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात जिल्हा बँकेच्या वार्षिक आमसभेकरीता संपूर्ण जिल्हाभरातून आलेले विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी येताना तर दरवर्षीप्रमाणेच आले. मात्र सभागृहात आल्यानंतर व जाताना एक अनोखे दृश्य बघायला मिळाले. हे दृश्य बघताना खऱ्या अर्थाने बोध होत होता की, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती कार्यरत आहे....
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात उपस्थित सर्व संचालक मंडळ व जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रतीक असलेली भगवी टोपी परिधान करुन व हातात ग्रामगिता घेऊन असल्याचे दिसत होते. अर्थातच सभागृहात आल्यानंतर बँक प्रशासनाने येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगतांना एक भगवी टोपी व ग्रामगीता भेट दिली होती. आमसभा संपल्यानंतर ही सर्व मंडळी बँकेच्या आवारातून बाहेर पडली व आपआपल्या गावी परत जातानाही यांच्या डोक्यावर ती भगवी टोपी व हातात ग्रामगीता घेऊन जातानाचे चित्र दिसत होते. ही एकूण सर्व दृश्य सुखद तर होतीच, सोबतच शिस्तबद्ध व गुरुदेव शक्ती कार्यरत असल्याचा अनुभव देणारी होती. नुकतच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना सुरु केली. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या इतिहासात न भूतो... असा हा आस्थेने व गुरुदेव विचारांच्या प्रतीकांनी भरलेला प्रसंग एका वेगळ्या दिशेची चाहूल देत होता...

Comments