लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित.

अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित.      

  माढेळी: येथील एका कृषी केंद्र संचालकाने शेतकऱ्याला नगदी पावती फाडूनही युरिया खत देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे केलेली होती त्या तक्रारीची दखल घेऊन कृषी केंद्राची तपासणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांनी त्या कृषी केंद्राच्या परवाना एक महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश पारित केलेला आहे.       
                 
                    माढेळी येथील सुनील कोहपरे या शेतकऱ्याने त्रिमूर्ती कृषी केंद्रातून जून महिन्यामध्ये युरिया खताच्या 15 बॅगची खरेदी केली होती व त्याची पावती सुद्धा कृषी केंद्र संचालकाने फाडून दिली परंतु खत साठा उपलब्ध नसल्याने युरिया खत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे व जादा दराने खत घ्यावे लागेल असे शेतकऱ्यास सांगितल्यामुळे सुनील कोहपरे या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे तक्रार केली केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या अनुदानित खताची विक्री शेतकऱ्यांना पॉस मशीन द्वारे करणे अनिवार्य केलेले आहे शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार एम एस वरभे गुण नियंत्रण कृषी अधिकारी वरोरा यांनी 15 सप्टेंबरला कृषी केंद्राची तपासणी करून तीन दिवसात खुलासा सादर करण्याबाबत कृषी केंद्र संचालकास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकाने 18 सप्टेंबरला आपला खुलासा सादर केला त्यानंतर पंचनामा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला होता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी 26 सप्टेंबरला सुनावणी घेऊन त्रिमूर्ती कृषी केंद्र संचालकास बाजू मांडण्यास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकांनी आपली बाजू मांडली खत (नियंत्रण) आदेश 1985 चे खंड 35 (1)(a) व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम ३(२)(i) चे उल्लंघन केल्याने सदर कृषी केंद्राचा रासायनिक खत किरकोळ विक्री परवाना 26 सप्टेंबर 2025 पासून पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात येत असून त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे

Comments