लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चेतन लूतडे 

चंद्रपूर - जिल्ह्यातील पीककर्जदार शेतकरी सभासदांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ऐतिहासिक व्याज सवलत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी संस्था स्तरावर थकीत असलेले पीक कर्ज व रुपांतर कर्जदार सभासद पात्र राहतील.

योजनेनुसार, संस्थेने आकारलेल्या मुख्य व्याजातून उचल तारखेपासून ७% दराने आकारलेले व्याज वजा करुन उर्वरित रक्कम व्याज सवलतीसाठी दिली जाईल. सभासदांना कर्जाची उचल तारखेपासून वसुली भरणा करण्यापर्यंत ७% दराने आकारलेले व्याज आणि मुद्दल रक्कमेचा एकमुस्त भरणा करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, मरण पावलेल्या कर्जदार सभासदांसाठी त्यांच्या वारसदारांनी संपूर्ण मूलधन आणि मरणाआधीच्या दिवशीपर्यंतचे व्याज भरल्यास, मरणाच्या दिवशीपासून आकारलेले संपूर्ण व्याज माफ करण्यात येईल.
ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून, योजनेच्या अटी व शर्थी बँकेच्या धोरणानुसार असतील. अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष मा.श्री. संजय डोंगरे व श्री राजेश्वर कल्याणकर संचालक मंडळ यांनी ही योजना अमलात आणली आहे.
प्रमुख कार्यालय : सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर-४४२४०१
कृषी क्षेत्रात आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठे लाभदायक पाऊल ठरणार आहे.
*********

Comments