लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

सीतारामपेठ येथे वाघाचा आतंक; पाळीव जनावरांचा बळीगावकऱ्यांचे वनविभागाला निवेदन ; 'नरभक्षकाला लवकर जेरबंद करा'


सीतारामपेठ येथे वाघाचा आतंक;  पाळीव जनावरांचा बळी

गावकऱ्यांचे वनविभागाला निवेदन ; 'नरभक्षकाला लवकर जेरबंद करा' .

जाहिरात
मोहर्ली, भद्रावती : सीतारामपेठ बिट परिसरात वाघाचे सततचे हल्ले आता गंभीर झाले असून गेल्या सहा महिन्यांत एका माणसासह अनेक पाळीव जनावरे बळी पडली आहेत. गावात आताचे दहशतीचे वातावरण आहे. ग्रामसभेकडून वन विभागाला नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माणूस ठार, पाळीव जनावरे बळी : गेल्या शुक्रवारी दिनांक २४ सप्टेंबर रोजी सीतारामपेठ बिट परिसरात श्री. अमोल नन्नावरे (राहतो भामडेळी) हे शेतात जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना गावकरीयांमध्यी कोणतीही कारवाई न झाल्यास भविष्यात अशाच घटना घडणार याची भीती निर्माण करणारी आहे. मागील सहा महिन्यांत या परिसरात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे ठार झाली आहेत. मोहर्जी-मुधोली मार्गावर मोटारसायकल सवारावर हल्ले झाल्याचेही नोंदवले आहे.

गावाजवळ सतत दिसतोय वाघ : केवळ मागील आठवड्यातच, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी श्री. विठ्ठल भोयर यांची गाय वाघाने ठार केली. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता गावाजवळ रस्ता ओलांडत असताना वाघ गावकरीयांना दिसला. तर, सोमवारी सकाळीही गावाजवळ काम करणाऱ्या काही महिलांना वाघ दिसल्याचे सांगितले जाते. यामुळे महिला व पुरुष यांचे रोजगारासाठी किंवा शेतीकामासाठी बाहेर जाणे धोकादायक झाले आहे.

गावकरी वैतागले, कारवाईची मागणी : गावकरी सततच्या या हिंसक वाघाच्या त्रासामुळे वैतागले असून, वन विभागाला याबाबत अनेक वेळा माहिती दिली गेली तरीही योग्य ती कारवाई होत नसल्याचे ते सांगत आहेत. ग्रामसभा सितारामपेठकडून मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना पाठवलेल्या पत्रात नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. गावकरीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने वन विभागाकडून तातडीने यावर उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

*********

Comments