लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चरूरखटीत: विजेच्या अनधिकृत कुंपणामुळे शेतकरी व निलगायीचा मृत्यू


चरूरखटीत: विजेच्या अनधिकृत कुंपणामुळे शेतकरी व निलगायीचा मृत्यू

वरोरा : तालुक्यातील चरूर खटी गावात रविवारी एका शेतात अनधिकृत पद्धतीने लावलेल्या विजेच्या कुंपणामुळे एका शेतकऱ्याचा तसेच एका निलगायीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीवर आली आहे. ही घटना रविवारी घडली असून, सोमवारी सकाळी तपासातून ही माहिती मिळाली.

मृत शेतकऱ्याची ओळख कवडू शंकर मोडक (५०) अशी आहे. रविवारी सकाळी ते बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते, परंतु संध्याकाळी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. सोमवारी सकाळी वामन तुळशीराम धाबेकर यांच्या शेतात त्यांचे निर्जीव शरीर आढळले. तपास दरम्यानच त्या शेतातच विजेच्या धक्क्याने मेलेली एक निलगायही आढळली.

शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपणाला अनधिकृत विजेचा कनेक्शन देतात, पण अशा निष्काळजी कृतीमुळे माणसांसह वन्यजीवांचेही प्राण जातात. या घटनेने अशा धोकादायक पद्धतींवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस तसेच विजेच्या वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वनविभागाने निलगायीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोलिसांनी प्रकरणाचा पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात शेतकुंपणात अनधिकृतरीत्या वीजप्रवाह सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.
---

Comments