लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

ठेवीदारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष शिबिर, 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवींचा परतावा

ठेवीदारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष शिबिर, 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवींचा परतावा

चंद्रपूर, २३ ऑक्टोबर (वृत्त) : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये सुमारे ८८ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा परतावा ३ लाख ७६ हजार २४२ खातेदारांना देण्यासाठी उद्या, २४ ऑक्टोबर रोजी एक विशेष जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या शिबिरातून ठेवीदार किंवा त्यांचे वारस यांना त्यांच्या न मिळालेल्या ठेवींचा दावा सादर करता येईल. जिल्हा प्रशासनाकडून सर्व संबंधित ठेवीदारांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांपर्यंत दावा न केलेल्या ठेवींची माहिती पोहोचवून, त्यांना त्यांचे पैसा परत मिळण्यास मदत करणे हा आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांनाही या ठेवींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास सांगितले आहे.

Comments