लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस (चंद्रपूर), २ सप्टेंबर २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात शहरातील सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे भाग घेतला आणि गणपती बाप्पाची आरती केली, त्यामुळे शहरातील सद्भावना आणि धार्मिक एकतेचे संदेश देण्यात आला.
या सर्वधर्मीय आरतीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बुद्ध धर्माच्या धर्मगुरूंनी सहभाग घेतला. घुग्गुस शहरात सर्व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहतात आणि या आरतीद्वारे त्यांच्या एकतेचा प्रत्यय देण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोंगळे यांनी या आयोजनात सहभाग घेतला.

जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने गांधी चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती उत्सवादरम्यान समाजात धार्मिक सद्भावना आणि एकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे शहरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, समाजसेवी आणि राजकीय नेते उपस्थित होते. सर्वधर्मीय आरतीने घुग्गुस शहराने जपलेल्या परंपरेचा पुन्हा एकदा पुरावा दिला आणि धार्मिक सौहार्दाचे संकेत दिले.

Comments