लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोडा येथील अंबादेवीचे जागृत देवस्थानअंबादेवीने दिले साक्षात दर्शन.

वरोडा येथील अंबादेवीचे जागृत देवस्थान

अंबादेवीने दिले साक्षात दर्शन.

वरोडा, २८ सप्टेंबर


येथील अंबादेवी हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे ते श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. जाणकारांच्या मते रेल्वेस्थानक मार्गावरील खांजी या गावाची सरमुकद्दम नामक व्यक्तीकडे मालगुजारी होती. अंबादेवीने त्यांच्या स्वप्नात येऊन साक्षात दर्शन दिले आणि 'मी जमिनीत आहे, मला बाहेर काढ, माझे ठाणे या गावाच्या सीमेवरील जंगलातील टेकडीवर आहे' असा संकेत दिला. त्यानंतर सरमुकदम यांनी गावकऱ्यांसमोर स्वप्नातील सर्व प्रकार कथन केला.

यावेळी दामोदर सातपुते, दिवाणजी झितू वस्ताद, साधू आगलावे, लोहकरे, कृष्णा वरघणे, भाऊराव पवार, भगवान घाटे यांच्या मदतीने सातपुते यांच्या शेतातील जागेची पाहणी करून खोदकामास प्रारंभ केला. त्यावेळी अंबादेवीची शीला त्यांना आढळली. या मूर्तीला बाहेर काढून बैलगाडीवर ठेवले. मात्र, घेऊन जाताना बैलगाडी जागची हलेना. यावेळी बंडीला ओढण्यासाठी अनेक बैल लावल्याची माहिती आहे. यानंतर नागरिकांच्या मदतीने या भागात असलेल्या टेकडीवरील एका बोराच्या झाडाखाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा जवळपास १०० वर्षांपूर्वीचा इतिहास सांगितला जातो. सरमुकदम यांनी यावेळी गावचे पुजारी दादाजी काळे यांना देवीची पूजा करण्यासाठी आणले. कालांतराने हरिप्रसाद नावाच्या व्यक्तीने आपल्या नावाचा फलक लावत येथे छोटेसे मंदिर उभारले. आज येथे देवीचे भव्य मंदिर उभे आहे.

या मंदिरात गावातील नागरिक नवरात्र उत्सव साजरे करतात. दरम्यान या देवस्थानच्या मालकीची १.१२ हेक्टर जमीन असून, या परिसरातच हे मंदिर असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जयंत टेंभुर्डे यांनी दिली. देवीच्या नवरात्रात या परिसरातील हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात. अंबादेवीचे हे देवस्थान जागृत असल्याची परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे. येथे भक्तांनी केलेला मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

Comments