लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बीएस इस्पात कंपनीविरुद्ध १२६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

बीएस इस्पात कंपनीविरुद्ध १२६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

वरोरा 

: वरोरा येथील बीएस इस्पात कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांविरुद्ध १२५.९५ कोटी रुपयांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहासातील ही सर्वात मोठी आर्थिक फसवणूक मानली जात आहे.

जाहिरात
*****

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) भवानी प्रसाद मिश्रा, आशिष पंडित, आदित्य मल्होत्रा आणि वित्तीय प्रमुख (सीएफओ) सागर कासनगोटुवार यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार : आर्माको इन्फ्रालिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शेखर लोहिया यांनी वरोरा पोलिस ठाण्यात ही तक्रार केली आहे.

फसवणुकीची पद्धत : तक्रारीनुसार,मार्च २०२१ मध्ये बीएस इस्पात कंपनीच्या एमडी भवानी प्रसाद मिश्रा यांनी आर्माको कंपनीच्या प्रतिनिधींना भेटून खालील गोष्टी सांगितल्या:

· त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथील मुकुटबन मार्की कोळसा खाण भाड्याने घेतली आहे.
· कोळशाच्या कमतरतेमुळे सरकारने ५०% कोळसा खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे.
· आर्माको कंपनीने गुंतवणूक केल्यास त्यांना कोळसा पुरवठा केला जाईल.

पैशाची हप्ती : याआश्वासनावर विश्वास ठेवून आर्माको कंपनीने प्रथम १ कोटी रुपयांचा चेक दिला आणि त्यानंतर कोळसा मिळाला. नंतर बीएस इस्पातने सीएमडीपीए (Coal Mines Development and Production Agreement) सोबत करार झाल्याचे आणि वरोरा येथील माजरा, चिनोरा खदान अधिकार मिळाल्याचे सांगून आर्माकोकडून अधिक पैसे उकळले. १६ सप्टेंबर २०२२ रोजी डिलिव्हरी ऑर्डर (डीओ) देखील दिला गेला आणि ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ६० हजार मेट्रिक टन कोळसा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले.

या आश्वासनानुसार, आर्माको कंपनीने बीएस इस्पातच्या खात्यात एकूण ५४ कोटी रुपये जमा केले.

फसवणूक उघडकीला : मात्र,बीएस इस्पात कंपनीने कोळसा पुरवला नाही. कारण, कंपनीने नियमांचे पालन न केल्यामुळे सीएमडीपीएने नोव्हेंबर २०२२ मध्येच करार रद्द केला होता, ही बाब नंतर उघडकीला आली.

एकूण नुकसान : तक्रारदार शेखर लोहियायांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कंपनीने बीएस इस्पातला एकूण ७२.५३ कोटी रुपये दिले होते. त्यापैकी फक्त ३५.९३ कोटी रुपयांचा कोळसा मिळाला. जून २०२४ पासून कोळशाचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. उर्वरित ३६.६ कोटी रुपये (अंदाजे ३७ कोटी) परत मिळाले नाहीत, असे त्यांनी नमूद केले आहे. एकूण फसवणूक १२५.९५ कोटी रुपयांचा आकार घेते.

या तक्रारीवरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२० ब आणि एमपी आयडी कायदा १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची तपासणी करत आहेत.
*******************************
जाहिरात
           कल्पतरू गणेश मंडळ वरोरा





Comments