लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आमदार करन देवतळे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन

आमदार करन देवतळे यांच्या हस्ते  महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर, २५ ऑगस्ट २०२५: आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन आणि चंद्रपूर जिल्हा योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट) या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा २२, २३ आणि २४ ऑगस्ट या कालावधीत आनंदवन येथे पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. करन देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. भारतीताई आमटे, श्रीकांत पाटील, डॉ. अरुण खोडस्कर, डॉ. मृणाल काळे, सुधाकर कहु, प्रा. सवाने, डॉ. विजय पोळ, राजेश पवार, माधव कवीवर, कवीश्वर सर, तानाजी बायस्कर आणि देशमुख सर या गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या योगपटूंनी आपले कौशल्य प्रदर्शित केले. योगपटूंनी केलेल्या उत्तम सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.

योगासन ही केवळ क्रीडा नसून तो आरोग्य, मनःशांती आणि एकाग्रतेचा अमूल्य वारसा आहे, असे स्पर्धेच्या निमित्ताने सांगण्यात आले. अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments