लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली

चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली

वरोरा 
चेतन लूतडे 

चंद्रपूर (२२ ऑगस्ट): क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या वतीने शेतकरी भवन, वरोरा येथे २१ व २२ ऑगस्ट या कालावधीत मनपा शहर व ग्रामीण स्तरावरील तायक्वांडो स्पर्धा भव्य पद्धतीने पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोसिएशन ऑफ चंद्रपूर व एअर बोर्न ट्रेनिंग सेंटर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेच्या नियमांची काटेकोर पालनाची देखरेख विशेष क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, जिल्हा क्रीडा समन्वयक वाल्मीक खोब्रागडे यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयंत टेमुर्डे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोक वर्मा, श्री. सुनील बांगळे, श्री. गणेश मुसळे, श्री. नरेंद्र बोरीकर व श्री. गुरुदेव जुंबडे यांनी सहभाग घेतला. इंटरनॅशनल रेफरी तेजंकित भोंगडे व नॅशनल रेफरी राजत गायकवाड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्णायकांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभली.

अध्यक्ष श्री. अमन टेमुर्डे, श्री. अशोक वर्मा, उपाध्यक्ष श्री. तानाजी बायस्कर, श्री. सागर कोहळे व सचिव श्री. बजरंग वानखडे (एनआयएस कोच, आंतरराष्ट्रीय पदक विजेते) यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा शिस्तबद्ध पार पडली. सहसचिव श्री. आकाश भोयर (राष्ट्रीय पदक विजेते) व खजिनदार श्री. सचिन बोधाने (राष्ट्रीय पदक विजेते) यांनी संघांना मार्गदर्शन केले. सल्लागार श्री. अक्षय हणमंते (राष्ट्रीय पदक विजेते) व श्री. मुकेश पांडे (एनआयएस कोच) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. पंकज चौधरी, पंकज शेंडे, दिव्या नंदनवार व जयंत विधाते यांनी सहाय्यक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संघटन कौशल्य व खेळाडूंच्या उत्साहामुळे ही स्पर्धा पारदर्शक, यशस्वी व संस्मरणीय ठरली.

Comments

Post a Comment