लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भारतीय जनता पार्टी माहिला आघाडी वरोरा तालुका व शहर तर्फे रक्षाबंधन सोहळा संपन्न.

भारतीय जनता पार्टी माहिला आघाडी वरोरा तालुका व शहर तर्फे रक्षाबंधन सोहळा संपन्न.

फक्त बातमी 
चेतन लूतडे 

वरोरा - सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार करण देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.  

प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), श्रीमती स्वेताताई देवतळे, अनिल फुलझले (माजी उपमहापौर, चंद्रपूर), सौ. वेदांती देवतळे, वंदनाताई शेंडे (अध्यक्ष, जिल्हा महिला आघाडी), अल्काताई आत्राम (महामंत्री, भाजप महिला आघाडी), संतोष पवार (भाजप शहर अध्यक्ष), राजेंद्र सवई (तालुका अध्यक्ष), वंदनाताई दाते (माजी जिल्हा परिषद सदस्य), लीलाताई बोडे (भाजप महिला आघाडी अध्यक्ष) इत्यादी विभूतींनी कार्यक्रमाला गौरवण केली.  

या कार्यक्रमात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्या आणि इतर महिला भगिनींनी राखी बांधून भावनिक उत्साह साजरा केला. सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भ्रातृभावाच्या शपथा पुनरुज्जीवित केल्या.


Comments