लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

राष्ट्रवादी नेते अविनाश ढेंगळे यांना मारहाण

राष्ट्रवादी नेते अविनाश ढेंगळे यांना मारहाण

**वरोरा** : वरोरा तालुक्यातील चिनोरा गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांनी गावातील युवक सौरभ झाडे याला फोनवर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या घटनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
ताज्या घटनेत अविनाश ढेंगळे यांनी गावातील दुसऱ्या एका व्यक्तीवर हल्ला केल्याने त्यांना स्वतःच मारहान सहन करावी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

घटनेनंतर वरोरा पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रारी नोंदवल्या आहेत. याआधी, सौरभ झाडे याने गावातील मोबाईल टॉवरला NOC (No Objection Certificate) मंजुरीबाबत प्रश्न विचारल्यावर ढेंगळे यांनी त्याला फोनवर धमकावल्याचे सांगितले जाते. यामुळे सौरभ गावाबाहेर लपून राहिला होता. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यास मदत केली.  

याआधीही ढेंगळे यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडीने विकत घेण्याबाबत अनेक खटले न्यायालयात चालू आहेत. गावातील अनेकांवर दहशत पसरवल्याचेही आरोप आहेत. या घटनेमुळे तालुक्यात राजकीय तणाव निर्माण झाला असून, प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Comments