लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*आक्षेपार्ह फलक प्रकरण* *योग्य चौकशी करा : प्रशांत कदम**पंधरा दिवसात छडा न लावल्यास उबाठातर्फे तीव्र आंदोलन* *प्रशांत कदम यांचा इशारा*

*आक्षेपार्ह फलक प्रकरण*
 *योग्य चौकशी करा : प्रशांत कदम*
*पंधरा दिवसात छडा न लावल्यास उबाठातर्फे तीव्र आंदोलन*
 *प्रशांत कदम यांचा इशारा* 

 वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा 

शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता व शहरात आज लागलेले आक्षेपार्ह फलक याची चौकशी करण्यासाठी उबाठा गटाचे विदर्भ संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी आज वरोड्याला भेट दिली.
     शहरात लागलेल्या आक्षेपार्ह फलकांबाबत त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जात तक्रार नोंदवली व योग्य कारवाई करण्याची मागणी केली. या आक्षेपार्ह फलक लावणाऱ्याचा शोध पंधरा दिवसात करून त्यांचेवर योग्य कारवाई करण्यात न आल्यास शिवसेना उबाठा गटातर्फे आनंदवन चौकात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.
       भद्रावती शहरातील अशाच प्रकारचे आक्षेपार्ह फलक लावण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
                शिवसेना सैनिकांना सन्मानाने पद बहाल करत असून व्यक्ती पक्षाला नव्हे तर शिवसेना  कार्यकर्त्याला मोठे करते. परंतु कार्यकर्त्यांना सन्मान मिळाल्यानंतर ते आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात रवींद्र शिंदे यांच्याबद्दल अनेक चौकश्या सुरू आहेत. त्यातून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी त्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
      येथील विश्रामगृहात प्रशांत कदम यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत नवीन जिल्हाप्रमुखांबाबत सैनिकांचे मत जाणून घेतले. या बैठकीचा अहवाल ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. यानंतरच चंद्रपूर जिल्हा प्रमुखांची नेमणूक केली जाईल अशी माहिती आहे. 
             यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, युवा सेनेचे जिल्हा संघटक मनीष जेठाणी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद पुरी, माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांचेसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
   ‌ शहरात आक्षेपार्ह फलक लावल्याची माहिती येथील शिवसैनिक उपजिल्लाप्रमुख पंकज नाशिककर यांना कळताच त्यांनी याची सूचना पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी लगेच हे आक्षेपार्ह फलक हटविले.
----
या आक्षेपार्ह फलकांच्या संबंधानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांची एक क्लिप सध्या समाज माधयमावर व्हायरल होत आहे. त्यात ते असे म्हणतात, की शिवसेनेत केवळ आर्थिक देवाणघेवाण ही आता उरलेली आहे. आपले तीनदा जिल्हाध्यक्ष पद घेण्याचा प्रयत्न झाला आणि  विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एबी फॉर्म वाटताना  पैशाची प्रचंड देवाण-घेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

Comments