लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

घोरपड दिले जीवनदान – वन्यजीव प्रेमींचा स्तुत्य उपक्रम

घोरपड दिले जीवनदान – वन्यजीव प्रेमींचा स्तुत्य उपक्रम

रवी बघेल भद्रावती 

भद्रावती शहरातील म्हलारी बाबा सोसायटी परिसरातील एका मंदिराच्या खोलीत घोरपड आढळल्याची माहिती नागरिक श्री. आशिषजी ठेंगणे यांनी वन्यजीव रक्षक श्री. अनुप येरणे यांना दिली. माहिती मिळताच अनुप येरणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश डूडूरे आणि प्रथमेश पुल्लूरवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घोरपड सुरक्षितपणे पकडून यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले.

एकीकडे काही लोक अजूनही घोरपडीसारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची शिकार करत असताना, दुसरीकडे वन्यजीव प्रेमी अशा प्राण्यांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी पुढे येत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

या संपूर्ण उपक्रमात वन्यजीव प्रेमी आशिष चायकाटे, श्रीपाद बाकरे, शैलेश पारेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रेस्क्यू झाल्यानंतर घोरपडला सुरक्षितपणे निसर्गात मुक्त करण्यात आले. यावेळी अनेक सहकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी समाजातील संवेदनशील नागरिकांनी पुढे येणे ही काळाची गरज असून, अशा घटनांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.
------------------****----------***---------------

मोहर्ली येथील बफर झोन मध्ये कॉलर टायगरची दहशत



Comments