लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था व घंटागाडी सेवा ठप्प – शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वरोरा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था व घंटागाडी सेवा ठप्प – शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वरोरा, ता. १८ जुलै –
वरोरा शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, त्यातच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांची सेवा बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना लोकसभा संघटक यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा यांना निवेदन सादर करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

शहरातील डोंगरावर चौक ते पटेल मेडिकल, गीताश्री मंगल कार्यालय ते कामगार चौक आणि एकार्जुना चौक ते आझाद वार्ड सार्वजनिक शौचालय या भागांतील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. मोठमोठे खड्डे व पावसाचे साचलेले पाणी यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका व सर्वसामान्य नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.

तसेच, शहरात घंटागाड्यांची सेवा बंद असल्याने अनेक भागांत कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

त्यामुळे  खराब रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, घंटागाडी सेवा तात्काळ पूर्ववत सुरु करावी,साचलेल्या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून कीटकनाशक फवारणी करावी व आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी निवेदन देताना शिवसेना माजी शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक दिनेश यादव, किशोर टिपले, माजी उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, युवासेना माजी तालुका प्रमुख भूषण बुरीले, जावेद शेख, अनिकेत काळे, मोहित गुप्ता आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments