लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वरोरा तालुक्यातील बार-रेस्टॉरंट मालकांचा करवाढीविरोधी मोर्चा*




 *वरोरा तालुक्यातील बार-रेस्टॉरंट मालकांचा करवाढीविरोधी मोर्चा* 

*दारूच्या ड्युटीमध्ये दिडपट वाढीविरुद्ध तहसील कार्यालयात निवेदन सादर*  

चेतन लूतडे 
वरोरा, १४ जुलै २०२५
 – महाराष्ट्र सरकारने २५ जून २०२५ रोजी उत्पादन शुल्क (ड्युटी) मध्ये दिड पट वाढ केल्यामुळे वरोरा तालुक्यातील रेस्टॉरंट आणि बार मालकांनी आज संपूर्ण दिवस बंद पाळून प्रतिकार व्यक्त केला. या निर्णयामुळे परमिट रुमवर तिहेरी करभार (१०% VAT, १५% फी व  ड्युटी 150%) पडल्याचे सांगून, वरोरा रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने शासनाला त्वरित ही वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.  
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन 

१.अवैध व्यापाराला चालना: करवाढीमुळे दारूचे भाव वाढून ,ग्राहक इतर राज्यांतून मद्य मागविणे किंवा नकली/अवैध माल वापरणे सुरू झाले आहे. यामुळे सरकारच्या महसुलात घट होत आहे.
२.सीमा चेकपोस्टची मागणी: राज्याच्या सीमेवर उत्पादन शुल्क चेकपोस्ट उघडावेत, जेणेकरून परराज्यातील दारू महाराष्ट्रात येऊ नये.  मेट्रो रिजन मध्ये येणाऱ्याचा परवाना फी ही शहरानुसार असावी.
३.विदेशी दारूवर निर्बंध: विमानातून येणाऱ्या प्रवाशांना परदेशी दारू आणण्यास मनाई करावी, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचा फायदा होईल.  
४. ग्रामीण भागात समस्या: ग्रामीण भागात वाईन शॉप्सचा अभाव असल्याने ग्राहकांना जास्त भाव द्यावे लागत आहेत.  अवैध दारु निर्मातीवर, विक्रीवर, अवैध ठिकाणी मद्य पिण्यास कडक धोरण अवलंबावे.

या सगळ्या घटनांचा प्रभाव रेस्टॉरंट व बार मध्ये काम करणाऱ्या लहान कामगारावर पडत असून बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे.

*आंदोलनाचे स्वरूप**  
आज वरोरा तालुक्यातील सर्व परमिट रुम बंद ठेवून, असोसिएशनचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. 
या आंदोलनाला  बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास नेरकर , राजूभाऊ महाजन, प्रवीण काकडे, शुभम चिमूरकर, अक्षय सोनटक्के, यासह अनेक बार हॉटेल व्यवसायीक आणि कर्मचाऱ्यांरी उपस्थित होते. या एक दिवशीय आंदोलनासाठी शहरातील बार बंद ठेवण्यात आले आहे. असोसिएशनने माध्यमांमार्फत हा विषय राष्ट्रीय स्तरावर नेण्याचाही आग्रह धरला असून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा  दिलेला आहे. 

जाहिरात


............................................



Comments