लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

दहा लाखापर्यंत उत्पन्न कर मुक्त कराकेंद्रीय वित्त मंत्र्यांना खासदारांचे पत्र

दहा लाखापर्यंत उत्पन्न कर मुक्त करा
केंद्रीय वित्त मंत्र्यांना खासदारांचे पत्र

देशाचे आगामी अर्थसंकल्पीय बजेट 1 फेब्रूवारी रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण या संसदेत सादर करणार आहे. तत्पुर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वित्त मंत्र्यांना पत्र लिहित दहा लाख रुपयांपर्यतच उत्पन्न कर मुक्त करण्याची मागणी केली आहे.

मागील दहा वर्षात महागाई गगनाला भिडली असून सामान्य माणूस बचत करण्यास असमर्थ ठरत आहे. सामान्य माणूसाचा कर भरपाई मुळे आर्थिक गणित कोलमडत आहे. देशात श्रीमंत आणि गरीब अशी दरी वाढत चालली असल्याने सामान्यांवर त्याचा आर्थिक भार पडत असल्याने 10 लाखांपर्यत उत्पन्न कर मुक्त करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांच्या कडे केली आहे. येणारे वित्तीय वर्षात दहा लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केल्यास सामान्य माणसांचा त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरीकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वित्त मंत्री यांना लिहिलेल्या पत्र लिहाले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची देखल वित्त मंत्री घेतात का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments