लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी - खा. प्रतिभा धानोरकर

केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी - खा. प्रतिभा धानोरकर

फक्त बातमी 

दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहे. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा संसदेबाहेर निर्दशने करुन निषेध केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना संविधानावरील चर्चे दरम्यान आपण आंबेडकर-आंबेडकर करता हि फॅशन झाली आहे. त्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे विधान करुन संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. कॉग्रेस सहीत सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा निषेध केला. या संदर्भात या वक्तव्याप्रती केंद्रिय गृहमंत्री यांनी देशवासीयांची माफी मागावी व संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक व्हावे अशी भावना देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.

Comments