लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-

            भद्रावती तहसील कार्यालयासह शहरातील अन्य कार्यालयात देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध शहरातील विविध शासकीय कार्यालय तथा निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजता प्रभारी तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या हस्ते तिरंगा फडविण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात सकाळी साडेसात वाजता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी  यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.सेवादल मैदानात 75 फूट उंचीच्या तिरंग्याचे नगरपरिषद कर्मचारी दुर्योधन गाऊत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भद्रावती पंचायत समिती कार्यालयात सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर हुतात्मा स्मारक येथे नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Comments