लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

नागरी रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म चे आधुनिकारक करा.रेल्वे प्रबंधकांना निवेदन सादर.

नागरी रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म चे आधुनिकारक करा.

रेल्वे प्रबंधकांना निवेदन सादर.

*नागरी येथे प्लॅटफॉर्म उंची व प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्या जाण्याकरिता योग्य मार्ग करून देण्याकरिता स्टेशन प्रबंधक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून तालुका महामंत्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सुरज धात्रक यांनी निवेदन दिले*

वरोरा 
चेतन लुतडे 

दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवार नागरी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने नागरी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक व रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन नागरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या अनेक समस्यांबाबत सुरज धात्रक व भारतीय जनता पार्टी या मोर्चाचे सचिव पवन डांगरे तुषार बावणे व युवा मोर्चाच्या सदस्यांनी निवेदन सादर करत नागरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधेबाबत बाबत चर्चा केली व नागरी वरून वरोरा चंद्रपूर करिता हिंगणघाट वर्धा करिता शेकडो प्रवासी रोज येणे जाणे करतात परंतु मागील काही वर्षापासून नागरी रेल्वे स्टेशन वरती प्लॅटफॉर्मची अवस्था अतिशय वाईट झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे तो त्रास होऊ नये म्हणून नागरी येथील युवा मोर्चाच्या वतीने रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन सादर केले.

*कु. वैष्णवी शंकरराव बुरघाटे  आयुर्वेदा एंटरन्स परीक्षेमधे भारतातुन टॉप 10 मध्ये.*

Comments