लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शेतकऱ्यांच्या सुखदुःखात धावून येणारे राजूभाऊ चिकटे शेतकऱ्याचे खरे कैवारी.या शेतकरी पुत्राला विधानसभेवर नक्की पाठवणार.

शेतकऱ्यांच्या सुखदुःखात धावून येणारे राजूभाऊ चिकटे शेतकऱ्याचे खरे कैवारी.

या शेतकरी पुत्राला विधानसभेवर नक्की पाठवणार. 

वरोरा 
चेतन लुतडे 

जाहिरात
आज दि 12Aug 2024 रोज सोमवार ला शेकोटी मुळे गोट्याला लागलेल्या आगीत गोट्यात बांधलेल्या  वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला तर काही जनावरे जखमी झाले, आणि शेती उपयोगी वस्तू आणि जनावरचे वैरण पूर्ण पणे जळले .तर संबंधित घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तसेच विदमान संचालक  राजू भाऊ चिकटे हे शेतकर्यांची बिकट परिस्थिती पाहून तात्काळ भेटीसाठी आले. शेतकऱ्याची परिस्थिती पाहून तात्काळ आर्थिक सहाय्य करत शेतकऱ्याची मदत केली. यापुढेही त्यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या पहिले सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून तात्काळ मदत करणारे राजूभाऊ चिकटे या परिसरात शेतकऱ्यांचे कैवारी ठरत आहे. या विधानसभेत शेतकरी पुत्र म्हणून नावलौकिक झालेले राजूभाऊ शेतकऱ्यांसाठी विधानसभेचे नेतृत्व करणार असा ठाम विश्वास शेतकऱ्यांनी केला आहे.
या वेळी श्री जनार्धन शेंडे शेतकरी, श्री वासुदेव शेंडे शेतकरी तर श्री राजू भाऊ चिकटे, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, सौ किरण नंदकुमार ढोक सरपंच पाचगाव ठा,श्री किशोर डुकरे सामाजिक कार्यकर्ते,  श्री पिंटू भाऊ सातपुते, सचिन भोयर, श्री राजेश राठोड ग्रामसेवक, श्री गुरुदेव तळवेकर तलाठी पाचगाव, ड्रा सतीश अघळते साहेब पशु वैदकीय अधिकारी तसेच गावातील नागरिक हजर होते तसेच पीडित शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समिती मार्फत आर्थिक मदत मिळवून देणार अशी ग्वाही दिली.

    शिर्डी येथे एक सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन

Comments