वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .

आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असुन शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, गोठा, जनावरे, पाळीव प्राणी आदींचे नुकसान झाले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. तरी नदी, नाल्या जवळच्या गावांना, रहीवास्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित स्थळी कुटुंब व जनावरे हलवा, वन्य जीवांपासून सावध रहा, पाणी गरम करुन प्या, आरोग्याची काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
विशेषत: वरोरा, भद्रावती तालुका प्रशासनासोबत आम्ही संपर्कात आहोत, आमचे सहकार्य राहील. आमचा 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरूच आहे. आत्मविश्वास बाळगा... आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत जनतेच्या मदतीसाठी तत्पर रहावे, कोणत्याही अतीआवश्यक मदतीकरिता माझ्याशी संपर्क साधावा.

सन २०२२ मध्ये जिल्ह्यात आलेल्या पुर परिस्थितीवर आपण सर्वांनी मात केली होती. तसाच आत्मविश्वास बाळगा, या सकंटावर सुध्दा आपण सारे मिळून मात करू या पद्धतीचे आव्हान रवींद्र शिंदे यांनी केले आहे.


संपर्क :रविंद्र शिंदे जिल्हाप्रमुख
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
9823752077

Comments