वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

कोळसा खाण प्रकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना क्रेडिट घेण्यासाठी दिशाभूल करणारे आंदोलन : किशोर टोंगे**खासदारांनी सत्तेचा माज करू नये किशोर टोंगे यांची बरांज प्रकरणावर प्रतिक्रिया*

*कोळसा खाण प्रकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना क्रेडिट घेण्यासाठी दिशाभूल करणारे आंदोलन : किशोर टोंगे*

*खासदारांनी सत्तेचा माज करू नये किशोर टोंगे यांची बरांज प्रकरणावर प्रतिक्रिया*

अतुल कोल्हे भद्रावती: 
                मतदार संघात गेल्या दहा वर्षापासून धानोरकर परिवार सत्तेत असून लोकांच्या हाताला काम देण्याऐवजी आतापर्यंत त्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप  करत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी कर्नाटक एम्पटा प्रकरणात झालेल्या आंदोलन व अधिकाऱ्यांना मारहाणीवर भाष्य केले.

जनतेने दिलेल्या आशीर्वाद व त्यातून मिळालेल्या सत्तेचा वापर हा मतदार संघातील जनतेचे विधायक मार्गाने विकास कामे करण्यासाठी असतो मात्र त्या ऐवजी त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केल्या जातो हे आता जनतेला लक्षात आले आहे. 

मतदार संघात अधिकाऱ्यांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार धानोरकर व त्यांच्या परिवाराकडून होत असल्याचा आरोप किशोर टोंगे यांनी केला आहे.
या प्रकरणात स्थानिकांनी उपोषण आणि आंदोलन केले होते तरी देखील स्थानिकांना न्याय देण्याचं काम केलं नाही. परंतु हा प्रश्न जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैय्या अहिर यांनी प्रश्न मार्गी लावला असून लवकरच त्याचे लाभ स्थानिकांना मिळणार असल्याचे लक्षात येताच आंदोलन करून स्वतःचा फायदा करून घेण्याचं आणि क्रेडिट घेण्यासाठी केलं आहे. 

निवडणूक प्रचारात लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा प्रचार करणारेच आता लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क असताना, प्रश्न कायदेशीररित्या मार्गी लावण्याचा पर्याय असताना हुकूमशाही करत आहे हे जनतेने ओळखले आहे. 

मागील दहा वर्ष आपण या मतदार संघात खासदार आणि आमदार म्हणून सत्तेत होतो तेव्हा तुम्हाला हे प्रश्न का दिसले नाहीत? आणि आता निवडणुका बघता आंदोलन करण्याचं कारण काय? असा सवाल वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी चे नेते किशोर दादा टोंगे यांनी केला आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे अन्यथा असे अनेक प्रकरण मतदार संघासाठी धोक्याचे ठरू शकते असे सांगितले आहे.

Comments