लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*भद्रावती वरोरा तालुक्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले**श्रीराम नगर येथील वट वृक्ष कोसळला तर चोरा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू*

*भद्रावती वरोरा तालुक्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले*

*श्रीराम नगर येथील वट वृक्ष कोसळला तर चोरा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              भद्रावती तालुक्याला पुन्हा एकदा दिनांक 9 रोज गुरुवारला दुपारी एक वाजता अवकाळी वादळी पावसाने झोडपले. या वादळी पावसात वीज कोसळून शहरातील श्रीरामनगर येथील माजी नगर सेवक चंद्रकांत खारकर यांच्या घरासमोरील 18 वर्षे जुने वडाचे झाड मंदिर तथा घरांच्या वाल कंपाऊंडवर कोसळल्याने मंदिराचे व दोन घरांच्या वॉल कंपाऊंडचे मोठे नुकसान झाले.
 तर तालुक्यातील चोरा गाव शिवारात वीज पडून अरुण दशरथ चिकटे व सुनील नामदेव आसुटकर यांच्या प्रत्येकी एका बैलांचा मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजता पासून तालुक्यात विजेच्या कडकडेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. या वादळी पावसाने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले असून तालुक्यातील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वीही तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले होते. या वादळात  तालुक्यातील माजरी गावातील घरांची मोठी पडझड झाली होती. 
वरोरा तालुक्यात सोसाट वाऱ्यासह वादळी पावसाने जबर हजेरी लावली यामध्ये वरोरा शहराची लाईन व्यवस्था कोलमडली होती. बऱ्याच ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. भर उन्हाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी शेतातील कामे रखडली असून  शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

Comments