लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*ओ.एफ. हायस्कूल चांदा मधील दहावीचा कविश मारबते शाळेतून सर्वप्रथम*

*ओ.एफ. हायस्कूल चांदा मधील दहावीचा कविश मारबते शाळेतून सर्वप्रथम*

अतुल कोल्हे भद्रावती :
                दहावी राज्य बोर्डाचा निकाल नुकताच जहिर झाला असुन भद्रावती येथील ऑर्डीनंस फॅक्टरी हायस्कूल चांदाने आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दहाविचा शाळेचा निकाल यावर्षी १०० टक्के लागला आहे.सदर दहाविच्या परीक्षेत मुलां-मुलींनी बाजी मारली असुन शाळेतून पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमधे तीन मुले तर एका मुलीचा समावेश आहे.शाळेतून कविश सुभाष मारबते या विद्यार्थ्याने ९४.६० टक्के गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.तर त्या पाठोपाठ मोहिनी खेडेकर हिने ९४.४० टक्के,कल्पक बोरीकर याने ९४.२० टक्के,शिवम बुराडकर याने ९४ टक्के घेऊन अव्वल आले आहे . याशिवाय सोबतच शाळेतील श्रुती आसुटकर हिने ९३.८० , वेदांत कांबळे याने ९३.४०, तनश्री पिंपळकर हिने ९० टक्के,अनुष्का माशिदकर हिने ८९.६०तर अथर्व कपाट या विद्यार्थ्यांने ८९.६० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रावीण्य प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य,मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई, वडील व गुरुजनांना देते.

.                  कविश मारबते ९४.६० टक्के
********************************************

Comments