1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments