वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा**माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

*तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करा*

*माजी जिल्हा परिषद सदस्य वानखेडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :
               तालुक्यात तथा शहरात लहान मोठे 29 तलाव आहेत. तलावांच्या या मोठ्या संख्येमुळे शहर तथा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिंगाडा तथा मस्य व्यवसाय एकवटला आहे.या व्यवसायांवर हजारो व्यवसायिक आपल्या कुटुंबाचे पोषण करीत आहे. मात्र अलीकडे या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते गाळ साचून  उथळ झाले असून शिंगडा तथा मच्छीमार व्यवसायिकांना फटका बसला आहे. शिवाय जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोलात चालली आहे. त्यामुळे या तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. भद्रावतीचा शिंगाडा व्यवसाय विदर्भात प्रसिद्ध असून शहर तथा तालुक्यातील तलावामुळे हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात वाढलेलाआहे. याशिवाय मुबलक तलावामुळे येथे मच्छी व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. मात्र हे तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात गाळ साचून ते उथळ झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या दोन्ही व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे शिंगाडा व मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे हे व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घठ झाली आहे. शिवाय उथळ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहत नसल्याने जमिनीची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर उपाय म्हणून तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी विजय वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे.

Comments