गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

*उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

अतुल कोल्हे भद्रावती:
               दारूबंदी उठल्यानंतर शहरात ज्याप्रमाणे शासनमान्य  दारू दुकानात वाढ झाली. त्याच वेगाने घरोघरी अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.ही अवैध दारू दुकाने ज्या वस्तीमध्ये आहे. तेथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आता तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच स्थानिक पोलीस लक्ष देतील काय?असावा सवाल नागरिक करीत आहे.
       शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भर वस्तीमध्येच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपापल्या घरीच दारूचे दुकाने सुरू केलीत.ती २४ तास सुरू असतात. या दुकानदारांना स्थानिक परवानेधारक दुकानदार दारूचा पुरवठा करतात. तसेच शहरालगतच्या तांडा वस्ती मधून हातभट्टीची दारू सुद्धा तिथे पुरवल्या जाते. हातभट्टीची दारू अनेकांच्या जीवावर बेतून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.या अवैध दारू दुकानामुळे वस्तीतील इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊन त्यांचे सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. आता तरी याकडे दोन्ही विभागाने लक्ष देऊन कारवाई करून ही अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी.अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

Comments