गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.हातात आलेले पीक गेले.

गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.

हातात आलेले पीक  गेले.

चेतन लुतडे वरोरा

               वरोरा तालुक्यातील बऱ्याच गावांना आलेल्या अचानक गारपिटामुळे तुर ,हरभरा, गहू , ज्वारी ज्वारी या महत्त्वाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील  तुमगाव, उमरी, बोरगाव, कोसरसार, साखरा, चारगाव, बेंबळा, या पट्ट्यातील  रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितीन मत्ते, राजू चिकटे  यांनी केली आहे.  
शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज कसे फेडायचे याचा विचार शेतकरी करून राहिला आहे. 
एकीकडे हमीभाव सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेला नाही यामध्ये पुन्हा गारपिटाने शेतकऱ्यांचे नुकसान केले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून 
येणाऱ्या दिवसात महागाई वाढेल अशी चिन्ह दिसत आहे.

नितीन मत्ते यांनी शेतकऱ्यांची कैफियत ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहानुभूती पर शेतकऱ्यांविषयी झालेल्या नुकसान भरपाई संबंधात सोमवारला तात्काळ निवेदन सादर केले असून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Comments