लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत पंजाबराव कृषी महाविद्यालय अकोला यांचे मार्गदर्शनात भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर व आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जवस - सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर खेमजाई तालुका वरोरा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उद्बोधन करताना म्हणाले की चना लागवडीचा पर्याय म्हणून जवसाची लागवड शेतकऱ्यांनी करावी ज्यापासून शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळेल व या पिकावर शक्यतो रोगराई पासून दूर असणारे पीक म्हणून याचा विशेष उल्लेख केला जातो . यावेळी श्री नितीन मत्ते यांचे हस्ते शेतकऱ्यांना बियाने व निविष्ठा वाटप करण्यात आले . या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ जवस उत्पादक डॉक्टर विना नायर मॅडम या उपस्थित होत्या .यावेळी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पोतदार सर व खेमजाई गावातील शेतकरी वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Comments