लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

वरोरा
चेतन लुतडे

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत देऊळवाडा गावांमध्ये अचानकपणे बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
देऊळवाडा हे गाव विजासन जवळ असून या टेकड्यांमध्ये पोलिसांची फायरिंग नेहमी होत असते. हा त्यांचा कवायतीचा भाग असतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही कवा आहेत या ठिकाणी केली जाते. परंतु विजासन या टेकडी पासून देऊळवाडा हे गाव दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. या ठिकाणची गाव वस्ती बरीच मोठी असून या ठिकाणी कच्चे घरे बनलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कवायती दरम्यान बंदुकीची गोळी येण्याचा त्रास बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी हा त्रास सुरूच आहे. 
पोलिसांनी बंदूकीची गोळी गावातून हस्तगत केली असून ही गोळी जशीच्या तशीच होती. त्यामुळे ही गोळी नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस निरीक्षक इंगळे  घेत आहे. 

मात्र हा वारंवारचा प्रकार असून गावामध्ये बंदुकीच्या गोळीने गावकरी दगावल्यास  पोलीस प्रशासन जबाबदार राहतील काय असा अहवाल गावकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे देऊळवाडा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments