लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वरोडा येथे भव्य आंदोलन*

*मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वरोडा येथे भव्य आंदोलन*

वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा
         मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज एक नोव्हेंबर रोज बुधवार ला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लक्षणिक उपोषणात अनेक मराठा समाजातील पुरुष,महिला व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या मुदतीतही आरक्षणाबद्दल शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने येथील मराठा सकल मराठा समाजातर्फे जरांगे यांच्या उपोषणाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात आले.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शाळेमध्ये जाणारे लहान मुले सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा ... अशा अनेक घोषणा देत सरकारला सतर्कतेचा इशारा आपल्या आंदोलनातून दिला. 
      येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी लाक्षणिक उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांनी त्यांना दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले.
       महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जनभावनेचा योग्य आदर करीत मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन समाजातर्फे करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनातून घेण्यात आला.

Comments