लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.नितीन मत्ते यांचा आक्षेप*

पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.
नितीन मत्ते यांचा आक्षेप* 

वरोरा १४/९/२३
चेतन लूतडे वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असून सणाच्या वेळेस सुट्टी दिल्या जाते. या दिवशी शेतकरी  परंपरेने शेतीमधील कामे बंद ठेवून बैलाची सेवा घरी करीत असतो. यासाठी सकाळपासूनच बैलांना मोठ्या प्रमाणात सजवले जाते. बैलांच्या आवडीचे खाद्य सुद्धा देण्यात येते. शेतकरी आपल्या बैल जोडीला सजवून  घरोघरी जाऊन त्यांचे पूजन करून आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण दिवाळी एवढाच महत्त्वाचा असतो.
मात्र या दिवशी सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज असून लहान लहान सणाला सुट्टी दिल्या जाते मात्र शेतकऱ्यांच्या सणाला सुट्टी का  दिली जात नाही.?असा आक्षेप शेतकरी नेते शिवसेना   जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आक्षेप दर्शविला आहे. यासंदर्भात वरिष्ठांना विचारणा केली असता.  वरिष्ठांना हा सण महत्त्वाचा वाटला नाही. 
त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकारी किती महत्त्व देते हे कळते. अशी प्रतिक्रिया मत्ते यांनी नोंदवली.




Comments