लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचा रिफ्लेक्टर बेल्ट

पावसाळा सुरू होताच मोकाट जनावरे वरोरा शहरातील मुख्य रस्त्यांवर येऊन बसत असतात. रात्रीच्या सुमारास ही जनावरे वाहन चालकाला कधी कधी दिसत नाहीत त्यामुळे  अपघात झाले आहे. याची उपाययोजना म्हणून वरोरा येथील सामाजिक संघटना,गांधी उद्यान योग मंडळाने गाईंच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या अनोख्या उपक्रमाला वरोरातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला असून या संघटनेची स्तुती होत आहे.

वरोरा शहरातील ,गांधी उद्यान योग मंडळ रुग्णांकरता रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, मेधावी विद्यार्थ्यांना मदत, गरजूंना वस्त्रांची मदत, गौ-मातेसाठी एक चपाती, व्यापारी मित्र मंडळाची सहल, धार्मिक ठिकाणी भंजन, किर्तन उपक्रम राबित असतात याबरोबरच विविध सांस्कृतिक आयोजन तसेच वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे गठन असे एक ना अनेक कार्य गांधी उद्यान सामाजिक संघटन करीत आहे. 
यातीलच एक उपक्रम म्हणजे भटक्या गाईंच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा उपक्रम होय. नरेंद्र नेमाडे यांच्या नेतृत्वात मनोज कोहळे, नितेश जयस्वाल, जयंत मारोडकर, आनंद गुंडावार, राजू घोडे, प्रवीण सुराणा, शैलेश शुक्ला, शुभम
बदकी, गिरधर नवाल, अजय नरडे, अनिल भडगरे, स्वप्निल देवाळकर ,राजू फलके, सुनील फाळके आणि सर्व सहकारी यांनी हे अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमामुळे गाईंना होणारी दुखापत तसेच नागरिकांचे होणारे अपघात यावर नियंत्रणात आणता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
या रिफ्लेक्टर मध्ये रेडियम ची पट्टी असून वाहन चालकाला ही दुरूनच दिसून येईल. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे जनावरांना सुद्धा कोणतीही दुर्घटना होणार नाही. त्यामुळे अशा मोकाट जनावर दिसल्यानंतर गांधी उद्यान योग मंडळाला सूचना द्यावे अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.

Comments