गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

एकोना खदान मधून कोळसा घेऊन जाणाऱ्या अज्ञात ट्रक च्या धडकेत तरुण ठार

एकोना खदान मधून कोळसा घेऊन जाणाऱ्या  अज्ञात ट्रक च्या धडकेत तरुण ठार

लोनगाडगा येथील घटन

वरोरा तालुका प्रतिनिधी- बाळू भोयर 
 वरोरा ते  माढळी रोड दरम्यान लोनगाडगा येथील तरुण    राजू बाबाराव दारुंडे  वय वर्ष 45  हा   सकाळी  6 वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना माढेळी कडून एकोणा माईंस कडे जाणाऱ्या  भरदार वेगवान  ट्रकने त्याला उडवले व त्याचा  त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना  आज सकाळी 6 वाजता  घडली.
      सकाळी तो त्याची पत्नी दोघेही घरून  सकाळी फिरायला गेले होते. मागून येणाऱ्या ट्रक चा अपघात झाला त्याच दरम्यान एक मोटरसायकलस्वार त्याच दरम्यान ट्रक च्या प्रकाशाने डोळे दिपल्याने त्याचा सुद्धा अपघात होऊन  मृतकाच्या बाजूला पडला  असल्याचे समजते.
 लोनगाडगा वंधली पांझुर्णी या गावातील लोकांनी त्वरित ट्रक बंद करण्यात यावे अन्यथा  रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.  
अपघातानंतर उपजिल्हा रुघणालायत नेण्यात आले व त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 
वेकोलीने कोळसा वाहतुकीसाठी रोडचे नियोजन न केल्यामुळे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वारंवार स्थानिक समस्या वाढत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे.




Comments