लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजुरकर परिवारास सदिच्छा भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजुरकर परिवारास सदिच्छा भेट

वरोरा 19/9/22
चेतन लूतडे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी वरोरा येथे  मनसे चे रमेश राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश राजूरकर हे आगामी निवडणुकीदरम्यान मनसे तर्फे विधानसभा क्षेत्रात प्रभावी नेतृत्व ठरणार असून मनसे सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन वार्तालाप केली. यावेळी मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही भेट दिल्याने मनसेची दावेदारी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्की मानली जात आहे. यावेळी राजूरकर परिवारांची विचारपूस करीत असताना पायाच्या ऑपरेशन अभावी चालणे जड झाल्याची खंत व्यक्त केली.
रमेश राजूरकर यांनी मागील विधानसभा पेक्षा यावेळेस नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन   राज ठाकरे यांना दिले. यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते

यानंतर चंद्रपूर येथील दौऱ्यासाठी ते रवाना झाले जातानी मात्र मनसे सैनिकासाठी गाडीतून हात बाहेर करून आभार व्यक्त केल्याने मनसे सैनिकात नवचैतन्य निर्माण झाले .

Comments