लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत १३वर्षीय अल्पवयीनमुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत अधिकक्षावर गुन्हा

धक्कादायक: भद्रावतीत १३वर्षीय अल्पवयीन
मुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत अधिकक्षावर गुन्हा
दाखल; आरोपीला बेड्या

भद्रावती तालुक्यातील बराज तांडा गावातील  प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या अधीक्षकाने संजय एकनाथ इटणकर वय ५३ वर्षे आरोपी तेथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावतीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर बराज तांडा गाव असून, गावापासून हाकेच्या अंतरावर  माध्यमिक प्राथमिक आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेत प्रत्येक गावातून अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या विद्यार्थिनींपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर आश्रमशाळेच्या अधीक्षकाने बलात्कार केला होता. आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी ही बाब लपवून ठेवली आणि नुकतेच हिंगणघाट येथे गेलेल्या पीडित मुलीच्या पालकांना फोन करून कळवले की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली आहे, तुम्हाला आश्रमशाळेच्या टीसीसोबत घरी घेऊन जा. काही कारणास्तव पालक दोन-तीन दिवस येऊ शकले नाहीत. त्यानंतर जेव्हा ते आश्रमशाळेत आले आणि आपल्या मुलीसह गावी गेले. हिंगणघाट येथे गेल्यानंतर पीडित मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती राहत असलेल्या घराच्या मालकिणीने विचारपूस केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यांनी तत्काळ हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले, तेथे हा सगळा प्रकार सर्वांना समजला. हिंगणघाट पोलिसांनी हे प्रकरण भद्रावती पोलिस ठाण्याकडे सोपवले, त्यानंतर आश्रमशाळेच्या अधीक्षकांना अटक करण्यात आली. आणि बाललैंगिक कायदा, पोस्को अंतर्गत अहवाल दाखल केला. या घटनेपूर्वीही आश्रमशाळेत अशा घटना घडल्या आहेत किंवा अन्य कोणत्याही मुलीसोबत अशा घटना घडल्या आहेत, हे पोलीस आपली कारवाई पुढे करत आहेत. आश्रमशाळेत येणाऱ्या गरीब मुलांसोबत अशी घटना घडणे ही लज्जास्पद बाब आहे. SDPO आयुष निपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस अधिक तपास करत आहेत. आणि अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांनी पूर्ण लक्ष ठेवले आहे.

Comments