लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रहार चे आंदोलन

स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रहार चे आंदोलन

वरोरा
चेतन लूतडे

जीएमआर विद्युत निर्मिती कंपनीमध्ये बेरोजगारांना काम देण्यासाठी प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन अटक करून सुटका करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी प्रहार संघटनेतर्फे जीएमआर विद्युत निर्मिती कंपनी विरोधात स्थानिकांना रोजगार देण्याबाबत आंदोलन उभारण्यात आले. मागील काही दिवसापासून या कंपनीमध्ये परप्रांतीय कामगारांना घेण्याचे काम जोरात सुरू होते याबाबत ठोस पुरावे गोळा करून याचा विरोध करत प्रहार चे किशोर डुकरे यांनी विचारणा केली असता कंपनी प्रशासनाकडून उडवा उडवी चे उत्तरे मिळाल्याने शुक्रवारी एकदिवशीय आंदोलन कंपनीच्या परिसरात करण्यात आले. यावेळी कंपनी प्रशासनाने पोलिसांची मदत घेत आंदोलन उधळून लावले सर्व आंदोलकाना पोलीस स्टेशन वरोरा येथे नेऊन तंबी देण्यात आली व सूचनेवर सोडण्यात आले. 
मात्र कंपनी प्रशासनाला कोणतीही चौकशी याबाबत करण्यात आली नाही किती कामगार या ठिकाणी आलेले आहेत याचाही ठाव ठिकाणा पोलिसांना नाही. त्यामुळे भविष्यात प्रहार संघटनेतर्फे भव्य आंदोलन करण्याचा इशारा किशोर डुकरे यांनी दिला आहे.

कंपनी प्रशासनाला विचारले असता विद्युत कंपनीने मेंटेनन्स साठी पाचशे कामगार बोलावले असून पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण करतील असे कळविण्यात आले.

Comments