लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

स्वातंत्र् दिनानिमित्त व अमृत महोत्सव माध्यमातून काढण्यात आली १०० मीटर तिरंगा यात्रा.

स्वातंत्र् दिनानिमित्त व अमृत महोत्सव माध्यमातून काढण्यात आली १०० मीटर तिरंगा यात्रा.

संपूर्ण भारतात स्वतंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव माध्यमातून घरोघरी तिरंगा जल्लोषात साजरा केला जात आहे. या अभियानाअंतर्गत भद्रावती शहरातील घरोघरी तिरंगा फडकवत  थाटात उत्सव साजरा करण्यात आला. स्वतंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सव भद्रावती शहरात दिसत आहे. स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य 100 मीटर तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या रॅली दरम्यान शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, प्रशांत शिंदे, ठाणेदार गोपाल भारती, सुनील नामोजवार, ज्ञानेश्वर डुकरे, सुधीर सातपुते, डॉ. विवेक शिंदे, संतोष आमने, रोहन कुटेमाटे, बंग, हर्षल शिंदे,  तथा शहरातील विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतातील लोक त्यांच्या सोबत स्वतंत्रताच्या 75 वर्ष हा सण साजरा करीत होते.

Comments