लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा*

*वरोरा एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा*

*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांचे जिल्हाप्रशासनाकडे मागणी* 

चंद्रपूर : वरोरा येथील एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याच्या माध्यमातून दोन मोठ्या कंपनीतील कामगार तसेच इतर वाहनांची ये - जा सुरु असते. परंतु या रस्त्याची स्तिथी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्याने अनेक अपघात होत आहे. त्यामुळे एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. 

नियोजन भवन येथे बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, एमआयडीसी बुरेले, जिएमआरचे विनोद पुसदकर, अक्षय ठाकरे यांची उपस्थिती होती. 

एमआयडीसी च्या उड्डाण पुलासाठी जे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग बांधण्यात आला. परंतु तो सुद्धा पूर्णतः खराब झाल्याने रत्नमाला - वरोरा - मोहबाळा हा ग्रामीण रस्ता वापरला जात आहे. यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा व रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहे. हा रस्ता सात दिवसात दुरुस्त करण्याची मागणी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी केली आहे.

Comments