लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

प्रवासी मृतकाच्या परिवाराला मुस्लिम बांधवांची मदत

प्रवासी मृतकाच्या परिवाराला मुस्लिम बांधवांची मदत

भद्रावती २४जुलै२२
रवि बघेल

रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या परिवारास भद्रावती येथील मुस्लिम समाज बांधवांनी माणुसकी जपत अंत्यविधीसाठी मदत केली असून शव त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून दिल्याने माणुसकीची भिंत मुस्लिम बांधवांच्या कृपेने उभी राहिली आहे.

17 जुलै रोजी बिहारहून बंगळुरूला जात असताना भद्रावती रेल्वे स्टेशन  विजासन जवळ अकबर अन्सारी नामक मुलगा चालत्या सुपरफास्ट ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत  बिहारमधील गोपालगंज गावचा रहिवासी असल्याचे कळाले. हा युवक कामासाठी  बिहारहून बंगळुरूला जात होते. त्याच्याजवळ असलेल्या आधारकार्ड मोबाईल वरून त्याची ओळख पटल्यावर कुटुंबीयांना सांगण्यात आले.

चार दिवसानंतर कुटुंबीय मुलाला पाहण्यासाठी आले असता ओळख पटली परंतु कुटुंबीय गरीब असल्याने बिहार मध्ये गाव असल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी कसा न्यायचा असा प्रश्न पडला होता. यावेळी भद्रावती येथील मुस्लिम समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य करत शव अंत्यविधीसाठी स्वगृही घेण्यासाठी व्यवस्था करून दिल्याने कुटुंबीयांनी खूप आभार व्यक्त केले. भद्रावती मधील मुस्लिम बांधवांची माणुसकीची  ही भिंत समाज कार्य करण्यासाठी प्रेरणास्थान आहे.

Comments