लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

नगर परिषदेचा १५५ वा वर्धापन दिन सदभावनेचा संदेश देत साजरा*

*नगर परिषदेचा १५५ वा वर्धापन दिन सदभावनेचा संदेश देत साजरा* 

वरोडा : श्याम ठेंगडी

               सदभावना एकता मंच , सदभावना युवा एकता , गुरुदेव सेवा मंडळ , ऐरबोन मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर , आॕल इंडीया कौमि तंझिम यांच्या संयुक्त विद्यमाने  वरोडा नगर परिषदेच्या १५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्वधर्म सामुहिक प्रार्थना व एकशाम शहिदों के नाम या वरोरावासियांना सामाजिक सदभावनेचा संदेश देणा-या एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  
      वरोडा नाक्याजवळील शहीद स्मारक येथे १७ मे रोज मंगळवारला सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी  तर प्रमुख अतिथी म्हणून  उपसर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुल आश्रम मोझरी लक्ष्मणराव गमे,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक गजानन भोयर , संवर्ग विकास अधिकारी राजेश राठौड , वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठौड हे उपस्थित होते . 
                 गुरुदेव सेवा मंडळाच्या सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेवर झाली . लगेचच सर्वधर्मिय प्रार्थना त्या त्या धर्मातिल प्रमुख व्यक्तींकडून घेण्यात आल्या . 
        अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना शिंदे म्हणाले की अशाप्रकारच्या आयोजनांची गरज पडू नये पण ती पडते याचा अर्थच असा आहे की कुठेतरी आपण चुकतोय . १५० वर्षांपूर्वी  शहर म्हणून मान्यता मिळालेल्या या शहराचा सांस्कृतिक इतिहास तसा चांगलाच आहे . या वैभवशाली परंपरेला तडा जावू द्यायचा नसेल तर शहराची शांतता सदभावना अबाधित राखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
                  नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी या वर्धापन दिनाचे आयोजन हे सामाजिक संघटनांकडून व्हावे ही गोष्ट अतिशय संवेदनशील आहे . या शहराचा सांस्कृतिक वारसा यामुळे लक्षात येतो . वरोडावासियांनी कचरा व्यवस्थापन , पाणी पुरवठा समस्या , वृक्ष लागवड इत्यादी बाबतीत नगर परिषदेला मदत करण्याचे आव्हान करतांनाच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी आभार मानले .
       लक्ष्मणराव गमे यांनी जनतेला दोन्ही वेळच्या सामुदायिक प्रार्थनेचे महत्व समजावून सांगितले . कार्य क्रमाचे प्रास्ताविक छोटूभाऊ शेख यांनी तर सूत्रसंचलन गोपाळ गुडधे यांनी केले . यावेळी आयोजनातील पाचही संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . स्टार ग्रुप वरोडा यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला .

Comments