लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अभाविप भद्रावती तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन

अभाविप भद्रावती तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन 

भद्रावती रवी बघेल

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भद्रावती शाखे तर्फे 'ध्येय व्यक्तिमत्त्वाचे' या संकल्पनेतून ध्येय २०२२ व्यक्तिमत्त्व विकास शिबिर २९ मे रोजी घेण्यात आले. या शिबिरात Time Management(वेळेचे व्यवस्थापन), नेतृत्व गुणवत्ता, वक्तृत्व गुणवत्ता, Cyber Awareness (सायबर जागरूकता), करिअर मार्गदर्शन, स्वताची ओळक व आनंदी जीवन या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अभाविप जिल्हा संघटन मंत्री अमितजी पटले, संजय पारधे व भद्रावती नगर मंत्री बाळा  भडगरे यांनी केले. या शिबिराच्या सायबर जागरूकता या सत्राला सय्याक पोलिस निरीक्षक सुधिर वर्मा केले व आनंदी जीवन या विषयाचे मार्गदर्शन राजेश हजारे यांनी केले. या शिबिराला भद्रावती मधील वेगवेगळ्या विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या दरम्यान गणेश नक्षीने,बाळा भडगरे, यश चौधरी, तनुजा येरने, गोपाल पारधे, निविदिता मुजुमदार, वैभवी बेहरे, सुन्नी पेटकर, शाकील शेख,मनिष चौधरी, लोकेश घाटे, पियुष बनकर, मयुर भडगरे उपस्तीथ होते.

Comments